काल रात्री झोपायला उशीर झाल्यामुळे आज सकाळी उठायला उशीर झाला होता रात्री कधीतरी आमचे मित्र वाराणशीवरून रेल्वेने आले होते आणि आमच्या शेजारच्या रुममध्ये ते थांबले होते. सकाळी उठलो आणि पाहतो तो काय लाईट गायब. गरम – गार काय पाणीच नव्हते. आम्ही हॉटेल वाल्याला विचारले तर कळले कि काहीतरी मोठा बिघाड झाला आहे आणि लाईट कधी येईल हे सांगता येणार नाही आणि त्यांच्याकडे जनरेटर नव्हते मग आम्ही त्यांना आम्हाला पाणी पुरवण्याची विनंती केली तेंव्हा त्यांनी शेजारच्या हातपंपावरून पाणी आणून दिले थंडी असली तरी ते हातपंपाचे पाणी कोमट असल्याने आम्ही त्यात अंघोळी केल्या. आवरून आम्ही निघणार तोच बाकीचे मित्र त्यांच्या अंघोळी राहिल्याने त्यांनी नंतर दर्शनाला जायचे ठरवले मग आम्ही आधी नाश्ता करण्याचे ठरवले आणि मग आम्ही दोघे पुढे दर्शनासाठी जाणार होतो आमच्या मित्रांना वेळ होता पण आम्हाला आजही १०० किमी ची एक परतीची राईड करायची बाकी होते आणि गोरखपूर मध्ये जाऊन सायकल लगेज मध्ये द्यायची असल्याने आम्हाला आज गोरखपूर मध्ये पोचणे गरजेचे होते. त्यामुळे आज आम्हला निघायचे असल्याने आम्हाला दर्शनाला लवकर जाणे गरजेचे होतो.
नाश्ता करून आम्ही एक इ-रिक्षा करून थेट मुख्य द्वारापर्यंत गेलो अनेक ठिकाणावरून मुख्य रस्ते वाहतुकीसाठी बंद असल्याने त्या रिक्षावाल्याने आम्हाला गल्ली बोळीतून थेट हनुमान गढी पर्यंत आणूस सोडले. तसी संपूर्ण अयोध्या भक्तिमय झाली होती हनुमान गढी वरून राम मंदिर परिसरात येईपर्यंत साडे अकरा होत आले होते. आज गर्दी खूपच जास्त असावी दर्शनासाठी चर रांगा हि दूरपर्यंत होत्या तेंव्हा आज आम्हाला प्रोटोकॉल दर्शन पास गरजेचा होता. एका गेटवर चौकशी केली तेंव्हा त्यांनी आम्हाला बाजूच्या ऑफिस मध्ये पाठवले तिथे गेल्यावर आम्ही चौकशी केली तेंव्हा त्यांनी आम्हाला इथे तुमच्यासाठी पास मिळणर नाही म्हणून सांगितले आम्ही पुन्हा गेटवरील अधिकाऱ्यांना भेटले त्यांनी पुन्हा आम्हाला त्याच ऑफिस मध्ये जायला सांगितले आम्ही पुन्हा त्या ऑफिस मध्ये जाऊन बाहेर चौकशी करण्याऐवजी ऑफिस मध्ये जाऊन विचारणा किली व आमच्याजवळ असणारे प्रोटोकॉल पत्र दाखवले त्यानंतर त्यांनी आमचे आधार कार्ड घेऊन आम्हला पास दिला तिथे दर्शनाला वेळेनुसार पास दिला जाते आमच्या वेळेत आम्हाला आत प्रवेश करणे गरजेचे होते. प्रवेश करण्यापृवी एके ठिकाणी आपले बूट / चप्पल आणि विजेवर चालणारे सर्व साधने जमा करावी लागतात आम्ही पास हातात पडताच पळत सुटलो पटकन आम्हे बूट, मोबाईल आणि इतर साधने जमा करून लवकरात लवकर मुख्य गेट वरून पास दाखवून आत गेलो पुढच्या गेटवर पास स्कॅन केला जातो तिथे गेल्यावर काही केल्या आमचा पास स्कॅन होत नव्हता तेथील अधिकर्यांनी बरेच प्रयत्न केल्यावर हि जेव्हा पास स्कॅन होईना तेंव्हा कळले कि पासवर दिनांक उद्याचा टाकण्यात आला आहे. आम्ही पुन्हा पळत त्या प्रोटोकॉल ऑफिस मध्ये गेलो त्यांना पास दाखवून तारीख बदल्यांची विनंती केली. त्यांनी आम्हाला पास बदलून दिला आणि पुन्हा आम्ही अनवाणी पायाने पळत पळत गेट वरून जिथे पास स्कॅन करतात तिथे पोचलो पास स्कॅन करण्याअगोदर लक्षात आले कि हेडफोन तर माझ्या गळ्यातच आहेत मग काय पुन्हा पळापळ करून हेडफोन ठेवण्यासाठी गेलो गेटवर विनंती करून पुन्हा आत आलो आणि मग शेवटी एकदा पास स्कॅन करून आत प्रवेश केला एकदा आत प्रवेश केल्यावर पुन्हा एके ठिकाणी तपासणी करून आंम्ही मुख्य मंदिर परिसरात पोचलो. एका मोकळ्या मार्गिकेतून आम्ही थेट मुख्य मंदिर परिसरात येऊन पोचलो. मंदिराचे काम अजूनही चालू आहे परिसरात सगळीकडे नक्षीकाम केलेले खांब त्यांच्या जागी बसण्यासाठी वाट पाहत आहेत. सर्वत्र कारागीर काम करत आहेत आणि अजूनहि कितीतरी दिवस हे काम चालुच राहणार आहे.

गोल – गोल वळणाचा बारी रस्ता पार करत आम्ही लवकरच मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ आलो. तिथे एक दोन वळणाच्या रांगा पार करून आम्ही पायऱ्या चढणार तोच आरतीची वेळ झाल्याने आम्ही थोडा वेळ तिथे थांबून पायऱ्यावरूनच आरती केली आणि थोड्या वेळाने मुख्य गाभार्यात प्रवेश केला. सर्व भाविक उत्साहाने भजन गात होते. जय श्री रामाच्या गर्जना करत होते. आमचे प्रभू रामाकडे पडणारे प्रत्येक पाउल प्रत्येक दिवसाचा हिशोब मांडत होते. उपसलेले कष्ट, गाळलेला घाम, सहन केलेली थंडी, धुक्याने व्यापलेले रोड ची आणि शेवटी न थकता व कसलीही कुरकुर न करता इथपर्यंतची सायकल साथी आणि आमची सर्वोच्च प्रेरणा होती ती प्रभू रामाची भेट आणि तो समय आता आला होता. माझ्या सायकल प्रवासाचे सर्व क्षण मी अभिषेकरुपी प्रभूराम चरणी अर्पण केले. कसलीही अपेक्षा नसताना आम्हाला मा. ना. श्री. चंद्रकांतदादा पाटील यांचे रूपाने आर्थिक आणि मानसिक आधार मिळवून देणारा आणि पुढे प्रत्येक समस्येवर तोडगा काढणारा आणि करता करविता तोच तर होता. जणू कौतुकाने आम्हाला प्रभू राम पाहत आहेत आणि आम्हाला आशीर्वाद देत आहेत. आमची विचारपूस करत आहेत. त्या भक्तिमय वातावरणात कितीही वेळ गेला तरी तिथून पाय निघत नव्हता परंतु तेथील कर्मचारी आम्हाला तिथून पुढे जाण्याची विनंती करत होते. आम्ही आनंदाने बाहेर येणाच्या मार्गाने पुन्हा आलो त्याच मार्गाने परत चेक पोस्ट वरून बाहेर पडलो.
आमचे समान आम्ही सामान कक्षातून घेतले आणि रूमकडे जाण्यासाठी वाहन शोधू लागलो. त्याआधी आम्ही तेथील परिसरात एक फेरफटका मारला. परंतू आम्ही नियोजन असे केले होती कि आज आम्हाला किमान १०० किमी ची एक शेवटची राईड करावी लागणार होती कारण आमचा प्रवास गोरखपूर वरून सुरु होणार होता आणि अगोदर लगेज बुक करावे लागणार असल्याने किती तास अगोदर लगेज बुक करू शकू याचा अंदाज येत नसल्याने आम्ही आज रात्री गोरखपूर मध्ये पोचून विचारपूस करून मग मुक्काम करण्याचे ठरले असल्याने आम्हाला आता जेव्हडे लवकर निघता येईल तेव्हडे आमच्यासाठी चांगले होते.
आम्ही रुमवर येऊन पटकन सर्व सामान आवरून आमच्या सायकली तयार केल्या पण सरांना आजहि सायकलसह आयोध्या लिहलेल्या पाटीच्या तिथे फोटो काढायचे असल्याने आम्ही पुन्हा सर्व लाव्याजम्यासहित मंदिराकडे गेलो तिथे काही फोटो काढले आणि मग आम्ही परतीचा प्रवास सुरु केला.
मुख्य हायवेला लागेपर्यंत दोन वाजून गेले होते. आता आम्ही प्रवासाची चिंता करत नव्हतो आम्हाला जे साध्य करायचे होते ते आम्ही केले होते आणि हि एक शेवटची समाधानाची राईड होती. परंतु जो उत्साह काल होता तो आज नव्हता सरयू नदी पार करायच्या अगोदर मी पाणी घेतले आणि थोड्याच वेळात आम्ही सरयू नदीचा पूल पार केला.
वाटेवर दोन्ही बाजूला भगवे झेंडे विक्रीसाठी दाटीने उभे होते. अवघा रोड भगवा झालेला होता. आम्ही आयोध्येचा निरोप घेतला आणि गोरखपूर कडे निघालो आज कितीही वेळ झाला तरी आम्हाला काही फरक पडणार नव्हता तव्हा आम्ही हे १०० – १२० किमी चे अंतर रात्री ११ वाजेपर्यंत पोचलो तरी आम्हाला चिंता नव्हती. वातावरण असे होते कि जणू सकाळचे आठ वाजले असावेत.
खरे तर आजची राईड सुरुवातीला जरी कंटाळवाणी आणि नकोशी असली तरी जसे आम्ही अयोध्या सोडली तसा एकदम गुळगुळीत डांबरी सपाट आणि उताराचा रोड लागल्याने आणि हवा हि अनुकूल असल्याने सायकल चालवायला एकदम मजा येऊ लागली. थोड्या प्रयत्नात खूप स्पीड मिळत असल्याने आम्ही मग सुसाट सुटलो होतो. सकाळी नाश्ता केला होता त्यांतर जेवण करायला वेळ मिळाला नव्हता चार वाजत आले होते आणि भूक चांगलीच लागल्याने आम्ही एका हॉटेल वर पराठे खाऊन पुढे निघालो आम्ही पराठे खाल्ले होते चार वाजता पण आकाश पूर्ण झाकलेले असल्याने आम्हाला सकाळी नाश्ता केल्यासारखे वाटत होते.
मध्ये वाटेत पहिल्यांदा गहू आणि मोहरी सोडून उसाचे थळ दिसत होते वाटेत आखाडे अर्धे बारीक उस भरलेले वाहने दिसत होते. तसेच रोड च्या दोन्ही वाजूला रसवंत्या दिसत होत्या. असा रोड जर काल मिळाला असता तर अजून लवकर आपण अयोध्येत पोचलो असतो असे आम्हाला वाटू लागले. सपाट गुळगुळीत रोड वरून आमच्या सायकली सुसाट धावत होत्या अंधार पडायच्या आसपास आम्ही बस्ती शहराजवळ आलो तिथे एका हॉटेल मध्ये चणे, भेल खाल्ली आणि पुढे निघालो. अंधार झाला होता शेवटचे एक दिवस आम्ही आमच्या सायकल च्या लाईट सुरु केल्या होत्या.
दमलेल्या शरीरला बस एक सांत्वना होती शेवटचे ४० किमी बस रोड एकदम बेस्ट सायकलला हि जणू घराची ओढ लागली होती त्यामुळे तीही सुसाट धावत होती.
एका प्रवासाची योजना आखली आणि पूर्ण समपर्ण ओतून ती आम्ही पूर्ण केल्याचे एक वेगळेच समाधान आम्हाला होते. इतरांना आमच्या या प्रवास्तून प्रेरणा मिळेल कि नाही हे माहित नाही पण आम्हचा आत्मविश्वास नकीच वाढला होता. स्वतःचा स्वतःलाच अभिमान वाटावा आणि स्वतःला स्वतःनेच शाबासकी देताना उर भरून यावा. प्रतिकूल परिस्थितीचा सामना करण्याचे धैर्य, आखलेल्या योजनेवर टिकून राहणायची जिद्द, निराश मनाला उभारी देण्याची वृत्ती आणि बरेच काही या प्रवासाने आम्हला दिले.
खरे तर आम्ही उत्तर प्रदेश मधून रात्री प्रवास करायचा नाही तिथे धोका आहे असा समज करून आलो होतो पण आम्ही उत्तर प्रदेश मधील सर्व दिवशी रात्री प्रवास केला आणि आज म्हणजे शेवटच्या दिवशी तर अकरा ते बारा वाजणार होते पण एकदाही आम्हला ऐकून असलेल्या अपप्रवूर्त्तीचा, हुल्लडबाजीचा सामना करावा लागला नाही. आमच्या संपर्कात आलेल्या सर्वानीच आम्हला पाठींबा दिला जवळचे रोड सांगितले आणि तुम्ही अगदी निर्धास्त जा तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही याची खात्री सर्वानीच दिली आणि आज आम्ही प्रवासाच्या शेवटच्या टप्यावर माझे उत्तर प्रदेशबाबत पूर्ण मत बदलून गेले.
साडेदहा – अकराच्या सुमारास आम्ही गोरखपूर मध्ये प्रवेश केला आणि थेट रेल्वे स्टेशन चे लोकेशन टाकून तिकडे निघालो रोडवरील गर्दी कमी झाली होती त्यावरून वेळ बराच झाला आहे हे कळत होतेच. बराच वेळ नकाशा पाहत आम्ही पुढे जात होतो चार – पाच किलोमीटर नंतर जाणवले कि आपण रेल्वे स्टेशन जवळ पोचलो आहोत आम्ही सरळ स्टेशन मध्ये सायकली घेऊन गेलो. सायकली बाहेर लावल्या आणि मी सायकल जवळ थांबलो आणि सर आत चौकशीसाठी गेले. आमच्या सायकल वरील पोस्टर पाहून बरेच लोक आमची चौकशी करू लागले. येणारे जाणारे काही मदत हवी का म्हणून विचारत होते.
एव्हड्यात एक आमच्याच वयाचा तरुण माझाकडे आला आमच्या सायकली न्याहाळून मला विचारू लागला पुणे से यओध्या यात्रा है आपकी लेकीन आप गोरखपूर कैसे ? मी त्याला सर्व सांगितल्यावर त्याने माझ्याशी हात मिळवत माझे अभिनंदन केले. पाणी हवे का म्हणून विचारले आणि माझ्या जोदिदाराबाबत हि विचारले. आम्ही कुठून -कोठे प्रवास केला या बाबत त्याने विचारले. मग तो म्हणाला “उत्तर प्रदेश कैसा लागा आपको ? कोई तकलीफ हुई आपको यहाँ ? त्यावर मी त्याला म्हणालो “नहीं बिल्कुल नहीं यहाँ के लोग तो बहोत अच्छे हैं हमने उत्तर प्रदेश के छोटे गावों से भी सफर किया हमे तो सबने स्नेह दिया” यावर तो म्हणाला “यूपी अब बहुत बदल चुका है… मानते हो कि नाहीं?” त्यावर मी “यकीनन…. मैंने इससे पहले तो नहीं देखा था पर जो सुना था वह तो मुझे बिल्कुल नहीं लगा” तो मोठ्याने हसून म्हणाला “तो अब आप महाराष्ट्र वाले “ महराष्ट का यूपी बिहार किया ऐसा मत कहा करो उसमे से यूपी हटा दो” मी हासून त्याला विचारले तुम्हाला काय माहित आम्ही असे म्हणतो ते त्यावर तो अजून खळखळून हसत म्हणाला “अरे साब! हम सब जनत ह!” म्हणत तो बाहेर पडायच्या रोडकडे निघून गेला.
थोड्या वेळात सर चौकशी करून परत आले मग आम्ही गेट क्रमांक ६ शोधत बसलो थोड्या वेळाने आम्हाला आमचे ठिकाण सापडले तिथे चौकशी केल्यावर कळले कि सकाळी १० वाजेपर्यंत सायकल जमा केल्या तरी चालतील मग आम्ही अगदी समोरच रूम शोधायचे ठरवले तिथे २४ तास खूप वर्दळ असल्याने राहण्यासाठी खूप पर्याय होते आज पहिल्यांदा आमला काही मिनिटात रूम मिळाली रूम मध्ये सायकल लावता येणार असल्याने आणी गरम पाण्यासाठी हिटर असल्याने आम्ही लगेच ती रूम बुक केली.
सायकल वरले समान उतरवताना गहीवरल्यासारखे होऊ लागले होते या प्रवासातील हे शेवटचे लगेज आम्ही उतरवत होतो. रोजची एक सवय लागली होती आणि आता उद्यापासून हे नसणार याचा आनंद आणि हूरहूर दोन्ही भावना एकत्रच होत्या. आम्ही आमचे लगेज रुममध्ये ठेवले आज मोबाईल सोडून इतर गोष्टी चार्जिंग ला लावायची गरज नव्हती आम्ही समान तसेच ठेऊन देऊन अंघोळी केल्या तोपर्यंत १२ वाजून गेले होतो दिवसभर आम्ही जेवण केले नव्हते तेंव्हा आता जेवण करणे गरजेचे होते.
उशीर झाल्याने आम्ही लवकर बाहेर पडलो जेवण करून आल्यावर मग सामान आवरू असे ठरवून आम्ही जेवणासाठी शुद्ध शाकाहारी हॉटेल शोधू लागलो परंतु तिथे सर्व टपऱ्या व मांसाहारी खानावळी होत्या आम्ही थोडी विचारपूस केल्यावर एके ठिकाणी आम्ही जेवायला गेलो तीथले जेवण काही आम्हला रुचले नाही पण आता पर्याय नाही म्हणून आम्ही थोडे जेवण घेतले आणि आता कुठे दुध मिळते का ते पाहू लागलो पण आम्हाला दुध कुठेही मिळाले नाही तेंव्हा काही बिस्कीट व फरसाण घेऊन आम्ही रूमवर आलो.
उद्या थोडे निवांत उठून सकाळी नाश्ता करू सायकल लगेज डीपार्टमेंट मध्ये जमा करू आणि मग येथील गोरक्षमंदिरात जाऊ आणि मग जेवण करून रूम सोडू असे नियोजन करून आम्ही झोपी गेलो.
उद्या लवकर उठून पुन्हा एक नवा टप्पा गाठायचा नसल्याने आम्ही सहज झालो होतो आणि एक वाजून गेला तरीही झोपलो नव्हतो. आजपर्यंतच्या प्रवासादरम्यानच्या गोष्टींचा आढावा घेत घेत केव्हा झोप लागली ते कळलेही नाही.
साकळी उठलो ते थेट पोटात कावळे ओरडायला लागल्यावरच आज आवरायची कसलीही घाई नव्हती आम्ही निवांत आमचे सामान आवरले सायकल चे कपडे ठेऊन दिले आणि आज दिवसभर व रेल्वेमध्ये घालन्यासाठीचे कपडे वर ठेऊन बाकीचे समान रेल्वेत ठेवण्यासाठी तयार ठेवले मग आम्ही नाश्ता करण्यासाठी बाहेर पडलो. नाश्ता केल्यावर आम्ही रेल्वे प्रवासात खाण्यासाठी काही सुका मेवा, फरसाण घेतले आणि रूमवर परत आलो.
आम्ही मग मोकळ्या सायकली घेऊन गेट क्रमांक ६ कडे गेलो तिथे गेल्यावर आम्ही काल रात्री चौकशी केल्याप्रमाणे सायकल जमा करण्यासाठी चलन भरले परंतु ऑनलाईन पेमेंट होत नसल्याने आम्हाला काही वेळ तिथे थांबावे लागले थोड्या वेळाने आमचे पेमेंट झाले आणि आम्ही सायकली वर स्टीकर लाऊन बाकी प्रक्रिया पार करून आम्ही तिथून बाहेर पडलो आणि ई रिक्षा करून गोरखनाथ मंदिराकडे निघालो.

रिक्षावाल्याने आम्हाला गल्ली बोळाच्या रस्त्याने घेऊन गेला थोड्या वेळाने आम्हाला त्याने मंदिरपरिसरात आणून सोडले. आमच्या अपेक्षेपेक्षा खूपच मोठे मंदिर होते आणि तिथे सुरक्षा व्यवस्था हि चोख होती आम्ही प्रार्थमिक तपासणी नाक्यावरून तपासणी झाल्यवर मंदिर परिसरात पोचलो. प्रवेशद्वारापासून दोन रस्ते फुटत होते एक रस्ता मंदिराकडे तर एक रस्ता तिथे भरलेल्या यात्रेकडे जात होता. आम्ही विचारपूस करून मग मंदिराकडे जाणाऱ्या रोडने पुढे जाऊ लागलो रस्त्याच्या दोन्ही बाजूला दाटीने दुकाने थाटलेली होती. तिथे एक भल्या मोठ्या पुरी सारखा पदार्थ आमचे लक्ष वेधून घेत होता. आम्ही विचारणा केल्यावर कळले कि हि “खजला” नामक इथली प्रसिद्ध मिठाई आहे. आम्ही दर्शन केल्यावर हि मिठाई ची चव चाखू असा विचार करून दर्शनासाठी मुख्य मंदिराकडे चालू लागलो.
प्रशस्त मंदिर परिसर व एकूणच वर्दळ पाहून या शहराचे नाव गोरखपूर या देवस्थानावरून पडले असावे असा अंदाज मी बांधला. जेव्हा आम्ही मुख्य मंदिरात प्रवेश करण्यासाठी निघालो असताना पुन्हा एका तपासणी नाक्यावर आम्हाला तपासणीला सामोरे जावे लागले तिथे त्यांनी आम्हाला आमचे कॅमेरे आत नेता येणार नाही असे सांगितले आणि परत पाठवून दिले गर्दी फार नव्हती त्यामुळे आम्ही परत फिरून ठरवले कि एक – एक जन जाऊन येऊ कुणाकडे सामान ठेवणे योग्य नाही. मग प्रथम मी आत प्रवेश केला. अगदीच प्रशस्त व एकदम स्वच्छ मंदिर जिथे प्रवेश करताच अगदी प्रसन्न वाटत होते.

स्वच्छ गुळगुळीत थंड फरशीवरून श्री गोरखनाथ मुख्य मंदिर गाभाऱ्यात पोचलो तिथे तैनात सुरक्षा अधिकाऱ्यांना विनंती केली कि मी इथे फोटो काढू का त्यांनी विचारले कोठून आलात पुण्यातून आलो आहे हे कळल्यावर थोड्या वेळाने त्यांनी मला तिथे फोटो काढायला परवानगी दिली.
दर्शन घेऊन दुसऱ्या बाजूने मी बाहेर पडलो तिथे नाथ संप्रदायाला समर्पित अनेक छोटी मंदिरे आहेत प्रयेक ठिकाणी मी गेलो तिथे अनेक संत, महात्म्यांच्या मुर्त्या रांगेत आहेत जिथे मला संत ज्ञानेश्वर महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, समर्थ रामदास स्वामी यांचे शिल्प तिथे आहेत.
भव्य मंदिर परिसर फिरून झाल्यावर मी सुयोग सरांना फोन करून आमचे सामान माझ्याकडे ठेऊन घेऊन त्यांना दर्शनासाठी सोडले. त्यांचे दर्शन होईपर्यंत मी समोर एका ठिकाणी शेकोटी पेटवलेली होती तिथे काही पोलीसकर्मी शेकत होते त्यांच्यात शामिल होऊन मी माहिती घेण्याचा प्रयत्न केला. त्यांना मी वचारले कि इतकी कडेकोट सुरक्षा आमच्याकडील मोठमोठ्या मंदिरानाही नाही इथे का आहे त्यावर तेथील एक पोलीसकर्मी म्हणाला कि योगी आल्यापासून सगळीकडे कडक सुरक्षा व्यवस्था आहे. माग मी मघाशी मी बंधलेला आडाखा पडताळण्यासाठी विचारले कि गोरखपूर चे नाव गोरखनाथजी के नाम पर हि पडा है ना? त्यावर तो थोडा वेळ थांबला मग आढेवेढे घेत म्हणाला “हा तूम ऐसा समझ सकते हो बहोत लोग ऐसाही समझते हैं। लेकिन यहाँ पर एक बड़ा शायर हुआ था जिसका नाम गोरखपुरी था उसके नाम पर इस शहर का नाम पड़ा हैं ”
मी असेल असे असा विचार करून सर येईपर्यंत काही दुकाने धुंडाळली सर आल्यावर मी हि मला त्या पोलिसाने सांगितलेलं त्यांना सांगितले पण साधे सर्च करून या गोष्टीची खातरजमा त्यावेळी नाही केली नंतर मला खरी माहिती मिळाली पण त्याने असे का सांगितले हे मला नाही समजले.
थोड्या वेळाने सर आल्यावर आम्ही सकाळी काही व्यवस्थित नाश्ता केला नव्हता तेंव्हा आम्ही तिथे नाश्ता केला आणि मघाशी खजला मिठाईची चव घ्यायची राहिली होती ती घेण्यासाठी आम्ही एका दुकानातून खजला मिठाई चा एक पीस घेतला परंतू आम्हा दोघांनाही हि चव अजिबात आवडली नाही मैद्याची पुरी पाकात भिजवल्यासारखी हि मिठाई न आवडल्याने आम्ही बांधून घेतली आणि मंदिर परिसरातून बाहेर पडलो. गेले दोन दिवस आम्ही पूर्ण जेवण घेतले नव्हते तेंव्हा आज परतीचा प्रवास सुरु करण्याअगोदर पूर्ण जेवण घेण्याचा आमचा बेत होता मग काय सुरु झाली शोधासोध शुद्ध शाकाहारी भोजनालयाची गूगलबाबा व स्थानिक लोकांशी चर्चा करून शेवटी आम्ही तेथील “गणेश मिष्टान” नावाच्या शुद्ध शाकाहारी भोजनालयाची वाट धरली थोडी शोधाशोध करून ते हॉटेल आम्हाला मिळाले. पुन्हा गोरखपूरला गेलो तर नक्कीच परत इथे येऊ अशी चव आम्ही संतुष्ट होऊन तेथून बाहेर पडलो आता रूमवर जाऊन थोडा आराम करून रेल्वे स्थानकाकडे निघायचे असे ठरवून आम्ही रूमवर परत आलो.
थोडा वेळ आराम करून पुन्हा एकदा सर्व सामान तपासले आणि आमचे सामान घेऊन रूम, रूममालकाच्या स्वाधीन करून बाहेर पडलो. सायकलवरील बॅग हातात घेऊन चालणे फारच जिकरीचे होते असाच अनुभव आम्हाला कन्याकुमारी प्रवासातहि आला होता त्यावेळेस अंतर बरेच होते आणि आम्ही समान डोक्यावर तर कधी खांद्यावर घेऊन स्टेशन जवळ केले होते. आज तशी परिस्थिती नव्हती रस्ता ओलांडून पलीकडेच रेल्वे स्टेशन असल्याने आम्ही लवकरच स्टेशन मध्ये पोचलो परंतु तिथे काम चालू असल्यामुळे आम्हला दूरच्या पुलावरून पलीकडे जावे लागणार होते मग काय आमचे लाटांबळ घेऊन त्या पुलाकडे निघालो कधी डोक्यार तर कधी पायात अडकवत पुढे निघालो कसे बसे आम्ही दुसऱ्या पुलावरून अनेक फलाट पार करत आमची गाडी ज्या फलाटावर येणार होती तिकडे जाऊ लागलो.
थोड्याच वेळात आम्ही आमच्या फलाटावर पोचलो तेव्हा कळले कि गाडी तर फलाटावर उभी आहे. मग आम्ही आमचा डबा शोधला आणि आमच्या आरक्षित जागेवर सामान ठेवले. पण आम्हाला चिंता होती कि आमच्या सायकली लगेज डब्यात पोचल्या कि नाही कन्याकुमारी मध्ये आम्हीच आमच्या सायकली डब्यात गाडी सुटायचा आधी दहा मिनिटे ठेवल्या होत्या इथे काय प्रकार आहे काही कळेना या बाबत आम्ही चर्चा करत असतानाच आमच्या सायकली लगेज मध्ये लोड केल्याचा मेसेज आला आणि आम्ही निवांत झालो.

आम्ही आमच्या सीट वर जाऊन विसावलो आणि मग गाडी सुटेपर्यंत आमच्या मित्रांच्या सीट शोधू लागलो जे बस्ती वरून या गाडीत बसणार होते. गाडी तिच्या नियोजित वेळेत सुटली आणि आम्ही समाधानाचा निश्वास सोडत गोरखपूरचा निरोप घेतला. आम्ही स्थिर स्थावर होईपर्यंत बस्ती या स्टेशनवर आमचे मित्रमंडळी गाडीत चढले त्याचे सीट आमचे सीट सोडून पलीकडील वाजूस होते तेंव्हा आम्ही आमच्या समोरील प्रवाश्यांना विनंती केली आणि सीट बदलून आम्ही सार्वजन शेजारी – शेजारी बसलो.
पुढे गप्पा – टप्पा मध्ये पूर्ण प्रवास कसा केला ते कळलेही नाही. २५ जानेवारीच्या पहाटे दोन – अडीच वाजण्याच्या सुमारास आम्ही पुणे स्टेशन वर उतरलो पुढे यथावकाश आमच्या सायकली लगेजमध्ये आल्यावर आम्ही त्या सोडवून घेतल्या तिथे फोटो काढले परंतू वेळ असल्याने आम्ही आळंदीवारी करायचे ठरवले एकादशीला सुरुवात केली होती आणि एकादशीला सांगता करू या विचाराने आम्ही आळंदीकडे आणि आमचे सोबत आलेली मित्रमंडळी आमचे सामान घेऊन घरी गेले.

आम्ही गप्पा मारत आळंदी गाठली माउलींचे आशीर्वाद घेतले. आमची आयोध्यावारी सफल संपूर्ण घडवल्याबद्दल आम्ही माउलींनां नमन करून घरी जायला निघालो.
आता आम्हा दोघांनाही घरी पोचण्याची घाई झाली होती. दगडूशेठ गणपती चे दर्शन घेतले आणि पुढे निघालो आता पायांना आणि शरीरालाही काही दिवस समाधानाचा आराम हवा होता शेवटचे काही किलोमीटर आम्ही आपापल्या घरच्या वाटेवर एकट्याने पार केले. माझ्या घराजवळील गणपती बाप्पाचे दर्शन घेतले आणि सोसायटीत प्रवेश केला तिथे माझे कुटुंबीय व मित्र मंडळी वाट पाहत होते. भव्य स्वागत स्वीकारून मी अधिकृत रूपे माझ्या पुणे ते अयोध्या सायकल वारीची सांगता केली.







